महाराष्ट्राचा विकासदर पाकिस्तानपेक्षा जास्त   

नाणेनिधीच्या आकडेवारीतून चित्र स्पष्ट

नवी दिल्ली : कर्जबाजारी पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने १९५८ पासून २४ वेळा मदत केली. मात्र, तरीही पाकिस्तानची आर्थिक स्थिती सुधारू शकली नाही. पाकिस्तानच्या विकासदरापेक्षा महाराष्ट्र आणि तामिळनाडू या राज्यांचा विकासदर जास्त आहे. तर भारताची अर्थव्यवस्था पाकिस्तानपेक्षा १० पट मोठी आहे. 
 
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या ताज्या आकडेवारीनुसार, पाकिस्तानची अर्थव्यवस्था २.६ टक्क्यांनी वाढली आहे, त्यांचा जीडीपी अंदाजे ३७३.०८ अब्ज डॉलर्स इतका आहे. राजकीय अस्थिरता, उच्च चलनवाढ आणि आंतरराष्ट्रीय कर्जे यासारख्या वारंवार येणार्‍या समस्या पाकिस्तानच्या विकासाला आणखी गाळात ढकलत आहेत. दरम्यान, भारताचा जीडीपी सातत्याने वाढत आहे आणि तो पाकिस्तानच्या वाढीच्या जवळपास १० पट जास्त आहे. भारत जगातील सर्वात वेगाने वाढणार्‍या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. २०२५ साठी भारताची वास्तविक जीडीपी वाढ ६.४ टक्के होती आणि सध्या जीडीपी ४ ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त झाला आहे. महाराष्ट्र आणि तामिळनाडूसारख्या भारतातील महत्त्वाच्या राज्यांचा जीडीपी आता पाकिस्तानच्या जीडीपीपेक्षा मोठा आहे.
 
महाराष्ट्राचे सकल राज्य देशांतर्गत उत्पादन ४२.६७ लाख कोटी रुपये आहे आणि तामिळनाडूचा जीएसडीपी ३१.५५ लाख कोटी रुपये आहे. महाराष्ट्र आणि तामिळनाडू हे दोन्हीही देशातील प्रमुख औद्योगिक आणि ऑटोमोटिव्ह केंद्र आहेत  तिथे मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण झाले आहे. ‘मेड इन इंडिया’वर पुन्हा लक्ष केंद्रित केल्याने या राज्यांमध्ये जीडीपी वाढीला आणखी चालना मिळाली आहे.
 

Related Articles